मराठी
चित्रपटांना चांगले दिवस आलेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र मराठीचा
प्रेक्षकसुध्दा आता वरकरणी गोष्टींनाच महत्त्व देतोय असंच वाटतं. एकीकडे
ज्याप्रमाणे 'दुनियादारी' आणि 'टाईमपास' या चित्रपटांना प्रेक्षक लाभलाय,
तर दुसरीकडे 'इनव्हेस्टमेंट'सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट कधी
आला आणि गेला हे अनेक मराठी भाषीकांना कळालचं नाही. यावरून आपण कोणत्या
गोष्टींना महत्त्व देतोय हे लक्षात घ्यायला हवं.
No comments:
Post a Comment